रोजचे आयुष्य वाटे; नित्य नवा शोध, कोण जाणे काय आहे; जगण्याचा रोध, रोजच्या जगण्यातून घ्यावा; थोडासा बोध, आयुष्य वेचिता वाचावा; थोडा सार्थबोध. .......सचिन पु. कुलकर्णी ( सपु )
About Me
- Sachin P. Kulkarni
- "सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.
Total Pageviews
Contact Me / संपर्क
Contact Me/ संपर्क:-
Youtube Channel :-
https://www.youtube.com/@spkulkarni
Instagram ID :-
sachin.kulkarni78
Facebook ID :-
sachin.kulkarni78
Latest Posts
नवीन लिखाण:-
Wednesday, December 14, 2011
Thursday, December 8, 2011
Wednesday, November 30, 2011
कविता - जुना मोबाईल.......
मला घरी आणताना; यांनी
जोरदार स्वगत; केले होते
घरी येणारा पहिलाच; मी
सगळ्यांना सरप्राईज; दिले होते
लहान बाळाला, घ्यावे तसे
मला घ्यायला सगळे, उत्सुक होते
चकाकणाऱ्या, मला ते
अगदी निरखून, हाताळत होते
आजी-आजोबा, वयस्कर
त्यांना फार काही, कळत नव्हते
पण एक, श्रीमंतीचा प्रकार
घरात आल्याचे, कौतुक होते
आई-बाबांचे, त्यांच्या ग्रुपमध्ये बोलणे झाले
स्नेक वर खेळून, चिंटूचे समाधान झाले
ताईने तिच्या मैत्रिणींना, "एस.एम.एस." पाठवले
खट्याळ बंटीने; किती तरी; मिस कॉल दिले
दादा संध्याकाळी; फिरायला म्हणून घेऊन गेला
बागेत भेटल्यावर तिला; मला दाखवू लागला
तिनेही माझे मग; खूप कोड-कौतुक केले
तिच्या नंबरला जरा; वेगळ्याच नावाने सेव्ह केले
पुष्कळ दिवस त्यांचे; मी कबुतराचे काम केले
असे सगळे माझे; नाविन्याचे दिवस होते
पैशाचे/बॅटरीचे; वेळेवर चार्जिंग होते
जसे दिवस गेले; तसा काळ बदलला; राव....... काय सांगू
साला; प्रगतीपायी आमच्याच तरुण पिढीने; माझा घात केला
जुने कपडे, खरवडलेला चेहरा
सुटे ढिले अंग, असा मी झालो आहे
पूर्वी वरच्या खिशात, हृदयाजवळचा; मी
आज कपाटात, खितपत पडलो आहे
© Sachin P. Kulkarni
sachin.kulkarni78@gmail.com
Monday, November 21, 2011
Tuesday, November 8, 2011
Thursday, October 20, 2011
लेख:- दिवाळी.......
दिवाळी पुढच्या महिन्यात आहे, दिवाळी दोन आठवड्यावर आली, असे म्हणता म्हणता दिवाळी आली...नेहमीच येते ती. आपल्या भारतीय संस्कृतीमधील एक सगळ्यात मोठा सण. अगदी लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना दिवाळीची आस असते.
© सचिन पु. कुलकर्णी
आपल्या संस्कृतीमध्ये साजरे करण्याला फार महत्व आहे. मित्र-मैत्रिणी /नातेवाईक यांना भेटणे, मिठाई वाटणे, फराळ करणे. जसे आपण एखाद्या क्रिकेटच्या सामन्याकरता एकदम तयारीत असतो , सुट्टी काढून/लवकर घरी येऊन, सामना जिंकल्यावरची तयारी म्हणून फटाके काढून ठेवतो, सोबत चहा आणि जोडीला मित्र, कशी धम्माल मजा, तसेच दिवाळीची देखील खास तयारी असते, दिवाळीत काय घ्यायचे, नवीन कपडे, नवीन वस्तू, त्याच्या पैशाची जुळणी आधीपासून करणे, ऑफिसमध्ये आधीपासूनच सुट्टीसाठी बोलून ठेवणे, त्यातून एखाद्याच दिवसाकरिता कामावर जावे लागत असल्यास ठरल्याप्रमाणे आजारी पडणे आणि मोठ्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेणे. मुलगा/मुलगी बाहेरगावी नोकरीला असल्यास ते एसटी मधून लटकून तरंगत येणे; खरे तर त्रासाचे पण दिवाळीला घरी जायची ओढ या सगळ्यावर मात करून जाते. असे आपण सगळे अगदी तयारीत असतो.
पण आता; आजकाल कुठे असे वाटू लागले आहे का, कि दिवाळीत काय करायचे? का फक्त सुट्टी काढून मित्र/मैत्रिणींना भेटा यचे . आजकाल दिवाळीकरिता जो फराळ असतो तो अगदी रोजच्या खाण्यात सुद्धा असतो. मला आठवते मी लहान असताना, दिवाळी म्हणली कि घरात महिन्याच्या यादीत जादा तेल/ साखर आणून सुट्टीच्या दिवशी आदल्या आठवड्यात चिवडा, शंकरपाळ्या, लाडू, चकली इत्यादीचा घाणा घरात व्हायचा, आणि असा खास दिवाळीचा खाऊ फक्त दिवाळीतच असायचा, पण आजकाल मॉल संस्कृती आली आहे, त्यात असलेसे बरेच पदार्थ सर्रास मिळतात, त्यामुळे हा एक पूर्वीच्या आणि आताच्या पद्धतीत फरक आहे, पूर्वी कपडे घेणे म्हणजे सुद्धा दिवाळीच निमित्त असायचे, आता याच मॉल आणि इतर दुकानात खूप साऱ्या सवलती देऊन कपडे आणि इतर वस्तू वर्षभर विकले जातात. मित्र-मैत्रिणींना भेटणे तर फेसबुक /ईमेल मुळे रोजचेच झाले आहे. थोडक्यात काय तर नकळत आपल्याला पूर्वीच्या काही पद्धतींना नवे अथवा पर्यायी स्वरूप मिळाले आहे.
म्हणून आपण दिवाळीत काही करत नाहीं असे नाही, नेहमीच्या पद्धती आपण पाळतच असतो. पण आजकाल काही जण मला असे बोलताना आढळतात कि दिवाळीत काही विशेष नाही........ याचा अर्थ आपल्याला आता दिवाळी हा वार्षिक रतीब तर नाही ना वाटत? कारण क्रिकेट आणि इतर वाढदिवस वगैरे दिवस पण साजरे करायची एक रीत रूढ झाली आहे; होत आहे, मग दिवाळीत काय असे खास? ...असे म्हणायला संधीं आहे का? हा काही नकारात्मक विचार वगैरे मुळीच नाही, पण काही जणांना त्याच गोष्टी आपण इतर दिवशी पण करतो म्हणून काही विशेष वाटत नाही. कारण तसेही आंघोळ तर आपण रोजच करतो, पण दिवाळीचे पहिल्या आंघोळीचे महत्व तर आहेच, ते कुणी काही म्हणल्याने बदलणार तर नाही. पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याला सतत बदल आवडतो, नेहमीच्या पद्धतीत बदल झाला तर ती गोष्ट अधिक भावते. तर आपण या दिवाळीत असे काय करू शकतो; कि ज्याने पुन्हा एकदा आपण सारे त्या दिवाळीच्या दिवसाची लहान मुलाप्रमाणे वाट पाहू?
विचार करायला लागल्यावर काही बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात येऊ लागल्या , त्यातील काही तर मी आणि माझे मित्र दरवर्षी करतो देखील. जसे कि मनुष्य संस्कृतीमधील दिवाळी हा मोठा सण, तर आपण हा फक्त आपल्यापुरता मर्यादित न ठेवता आपले मित्र/मैत्रिणी सोबत जोडतो, त्याप्रमाणेच आपण जर आपल्या समाजातील आजूबाजूला असणाऱ्या; पण परिस्थितीने अडचणीत असलेल्या लोकांना जोडले तर काय मजा येईल? आपल्या प्रत्येकाच्या गावात काही वृद्धाश्रम / अनाथालय असतात (जसे पुण्यात मातोश्री वृद्धाश्रम) ( मी काही एखाद्या संस्थेची जाहिरात वगैरे इथे करत नाही आहे, फक्त एखादा संदर्भ असावा म्हणून हा उल्लेख ), अगदी हे नसेल तर गरीब लोक असतात, आपले जुने पण खराब नसलेले कपडे; जर एकत्र करून अशा लोकांना/संस्थाना देऊ शकतो.
एखाद्या दिवाळीत वृद्धाश्रमातील आजी/आजोबांना काही फुले/फराळ देऊन त्यांना नमस्कार केला तर? त्यांनी थरथरत्या हातांनी दिलेल्या आशिर्वादाला कुठे तोड आहे का? एखाद्या गरीब स्त्री/माणसला आपलेच जुने; पण खराब नसलेले कपडे देऊ शकतो, कुणा गरीब मुलाला काही पेन/वह्या देऊ शकतो (जसे एखादी आश्रम शाळा), एखाद्या अनवाणी गरीब मुलाला साधी चप्पल, दिवाळी सोबत येणाऱ्या थंडीसाठी चादर देऊ शकतो; या आपण दिलेल्या मायेच्या पांघरुणाची ऊब निश्चित माणुसकीला अधोरेखित करणारी ठरेल. दिवाळी हा दिव्यांचा / रोषणाईचा सण, एखाद्या गरीब घरात पिवळा उजेड पडणारा दिवा असेल आणि त्याला आपण लख्ख शुभ्र उजेड पडणारा दिवा बसवून दिला तर घरासमोर लावलेल्या आकाशकंदीलापेक्षा त्या उजेडाला निश्चित एक वेगळी झळाळी असेल, त्याचा उजेड परमेश्वराच्या चरणापर्यंत नक्कीच पोचेल.
पैसे;वस्तू, कपडे; दागिने
चमचमीत खाऊ, आणि पक्वान्ने
हि नेहमीची, पद्धत सगळी
जरा वाटते, दिवाळी करावी वेगळी
चमचमीत खाऊ, आणि पक्वान्ने
हि नेहमीची, पद्धत सगळी
जरा वाटते, दिवाळी करावी वेगळी
अशी मदत केल्याने समोरच्या माणसाच्या डोळ्यात "कोण म्हणतो देव नाही, तो तर या मदत करणाऱ्या माणसांच्या रुपात आहे" असे भाव प्रत्येकाला नक्की दिसतील. चांगल्या गोष्टी करण्याला काही मर्यादा नाहीत, प्रत्येकाला जसे सुचेल तसे तो काहीतरी विधायक कार्य नक्की करू शकतो. मग काय म्हणता मित्र/मैत्रिणींनो यावर्षी काही तरी वेगळे करूयात? बघा असे केल्याने आपल्याला सुद्धा पुढच्या दिवाळीची आस नेहमीपेक्षा जरा जास्तच वाटेल.
तुम्ही; आम्ही असे विधायक काही केले तर नक्की दोन-चार लोक अजून येऊन मिळतील, अजूनतरी चांगेल काम करणाऱ्या लोकांना दाद द्यावी आणि आपणही मदत करावी इतकी माणुसकी शिल्लक आहे, आपण ती वाढवूयात. तुम्हा सर्वांना हि दिवाळी भरभराटीची, चांगल्या आरोग्याची जावो हीच माझ्याकडून शुभेच्छा!!!
देवाने दिला, माणसाचा जन्म
नको राहुयात, स्वत:मध्ये मग्न
आहे समाज, गरजू आजूबाजूला
जरा जागवू, माणुसकीचा झरा
नको राहुयात, स्वत:मध्ये मग्न
आहे समाज, गरजू आजूबाजूला
जरा जागवू, माणुसकीचा झरा
जो खरेच, असा विचार करेल
आपल्याच देशबांधवांना, मदत करेल
तो माणूस म्हणून, स्वत:च धन्य पावेल
त्याच्या कामाचा प्रकाश, ईश्वरचरणी पोचेल
आपल्याच देशबांधवांना, मदत करेल
तो माणूस म्हणून, स्वत:च धन्य पावेल
त्याच्या कामाचा प्रकाश, ईश्वरचरणी पोचेल
Monday, October 10, 2011
कविता - आता अजूनही मी, त्यास दान मागताहे
माणूस जन्माला आल्यापासून काही ना काहीतरी सतत देवाकडे मागत असतो. त्याच्या लहानपणी त्याला बोलता येत नसते, काही समजत नसते तेंव्हा त्याचे घरचे लोक त्याच्याकरिता देवाकडे काहीबाही मागत असतात. थोडक्यात एक सवय अशी लागते कि देव हा हट्ट करण्याकरताच बनला आहे अशी भावना होते .त्यावर लिहिलेली हि कविता.
------------------------------------------------------
आता अजूनही मी, त्यास दान मागताहे
ते माझेच लोक होते, याचना माझ्याचसाठी
------------------------------------------------------
आता अजूनही मी, त्यास दान मागताहे
झाली कितीक वर्षे, मी याचक बनून आहे
स्मरतात त्या दिसांचे, भलेबुरे क्षण पुराणे
न होती मला प्रतिभा, केवळ दिखावे पहाणे
परमेश्वरास बोलती कि, दे यास चीज खास काही
होऊन आज मोठा, ती आदत जखडून आहे
स्मरती जुन्या कितीत्या, मागोव्यातील लाख इच्छा
पुरल्या अनेक त्यातील, आज बोली नवीन आहे
लागले व्यसन फुकाचे, देवावरी हक्क थोपलाहे
त्यास सुटका तिथून नाही, मी घरात कोंडलाहे
त्यास सुटका तिथून नाही, मी घरात कोंडलाहे
देवही भला बिचारा, पुरवी लळे वाकुडे ते
त्यास माहित असावे कदाचित, मज जन्म याचकाचा आहे
Sunday, October 9, 2011
भजन - सदेह आम्ही भान हरपुनी, ऐसे भजनी रंगतो
कस्तुरीगंध अन् अमृतगोडी, सदा आम्ही चाखतो
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
सदेह आम्ही भान हरपुनी, जेंव्हा भजनी रंगतो
दोन हाती; दोन पंक्ती, करिता त्यांचा समेळ
किणकिण करी टाळ ती, जोडी परमेश्वरी नाळ
हाती घेता एकतारी, चेतविती दिशा चारी
तार छेडता आम्हा सोडी, आणुनी भक्तीमार्गावरी
धीरगंभीर ऐसा तो, वाजविता दोन्ही अंग
थाप पडता तो मृदुंग, आम्ही ईश्वरचरणी दंग
मधुर निरंतर गुंजे, श्वास तिचा भात्यावरी
पेटी वाजता ती संगे, आम्ही होतो निरंकारी
खळाळते निर्मळ पाणी, नाद ऐसा चिपळीला
आवाज पडता कानी ऐसा, रंगताती हरिलीला
कर दोन कमळ जैसे, टाळी ऐसी पडताना
भ्रमर गुंजारती तैसा, नादब्रह्म निर्मिताना© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
भजन - हरीभक्त आम्ही, हरीनाम जागर जागर
हरीभक्त आम्ही, हरीनाम जागर जागर
मार्ग कितीक मोक्षाचे, परी भक्तिमार्ग सुकर
काम धाम कष्ट सारे, आटापिटा पोटासाठी
आम्ही स्वार्थी जन ,जग चालवी तो जगजेठी
संसारात किती केले, परी शेवटी काही न उरे
जन्म-मृत्यू दोन टोके, जुळविता देह नुरे
ज्याचा शेवट माहित होता, त्याच्या आरंभी लागलो
निम्मे सरता; सारे कळता, देवाजीच्या पायी लागलो
सत्य पचवा सावकाश, जन्म मातीत शेवट मातीस
उपाधी कमविली कितीक, शेवटी राख हीच उपमा त्यास
जन्म माणसाचा घेतला, केला बहुत ऐसा साजरा
नरजन्मी कमवून काही, चुकव चौऱ्याऐंशीचा फेरा
नित्य कर्म चालू असो द्या, त्यात नका पाडू अंतर
राहो मनी भाव तयाचा, नाम हरीचे जपा निरंतर
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
Thursday, October 6, 2011
गझल - हरनजर हमारी उनकी खातिर तरसती है
दिलोंकी बात है तो, धड़कन यही बताती है
दिल की धड़कन, हो...हो..., ये दिल भी उनकी; खातिर धड़कता है
जिंदगी में प्यार, इक नई बात लगती है
प्यार का नशा पुराना, बस हम नए; खिलाडी है
सफ़र में वो हमसफ़र, तो सफ़र की क्या बात है
जब वो सफ़रमें, तो हम बेखबर मुसाफिर है
श्याम रोजकी मगर, आजकल अजीब लगती है
वो न आयी तो, बेवजा वो श्याम है
नजर की बात है, तो वो क्यूँ नजर; नहीं आती
हरनजर हमारी, उनकी खातिर तरसती है
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
sachin.kulkarni78@gmail.com
Sunday, October 2, 2011
हिंदी - भजन - हे मेरे प्रभू, नरवीर नरोत्तम
हे मेरे प्रभू, नरवीर नरोत्तम
हर युग इक, अवतार पुरुषोत्तम
हर अवतार में, जन दु:ख संवारे
कलियुगमें, दत्तअवतार पधारे
तिन शिरोवाले, तीनो लोक संभाले
छे हात तुम्हारे, षडरिपू संहारे
शंख चक्र गदा लेके, आप अवतारे
हम पामर दिन अब, आप के सहारे
पढ़ चुका चरित, आप की लीला अदभुत
दुःख न चुकत, न कृपा कंही दिखत
प्रभुजी अब न खेलो, और ऑंखमिचौली
देखो हर पल मेरी, हर घटिका बीत चली
सूरजसे तेज तुम्हारा, दिव्य मुखकमल
चाँद भी मुरझाये, ऐसी कृपा शीतल
दोनों बाजु खड़े, दो दो श्वान
पैरोतले रिक्त जगह, जहाँ मेरा प्राण
आप परम परमात्मा, आप हो दिव्य विभूति
तुम सम न तारणहार, ये हम जानत भलीभाती
कंधे पे लेकर चले, क्या छुपाया है झोली में
तुम्हरी कृपा का इक टुकड़ा, डालदो हमारे जीवन में
गुरुमहाराज चरणरज,
सचिन पु. कुलकर्णी
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
Wednesday, September 28, 2011
भजन - सेवा पाऊलांची देई आई....
Bhajan published on Antaraal Diwali Ank 2011.
http://antaraal.com/e107_v0617/content.php?content.2504-----------------------------------------------------------------------------------------------आज २८ सप्टेंबर २०११....... नवरात्री....... मायमाउली चरणी हे भजन समर्पित.
सेवा पाऊलांची देई आई.....
सेवा पाऊलांची, देई आई
सेवा पामराची, घेई
होता तुझी कृपा, आई
दु:ख दैन्य, संपून जाई
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा पामराची घेई
पाप कितीक झाले, जड डोई
ठावे नाही कुठे, नशीब नेई
काम काही करावे, म्हणता
हाती फळ लागत, नाही
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा लेकराची घेई
रूपे तुझी कितीक, आगळी
आम्हा मायेची, सावली
कधी दुर्गा, कधी अंबाबाई
वाघजाई कधी, फोड्जाई
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा पामराची घेई
माय, महिषासुरमर्दिनी
पद्मजावती; पद्मावती; वडजाई
माय तूच गं, तुळजाई
माझ्या कुलदेवीची, रूपे सारी
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा पामराची घेई
पद्मजावती; पद्मावती; वडजाई
माय तूच गं, तुळजाई
माझ्या कुलदेवीची, रूपे सारी
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा पामराची घेई
नाही पदरी पुण्य, ना धन
चित्त राही न, श्रीयावान
दु:ख सुटता सुटत, नाही
माय पावगे तू, लवकरी
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा लेकराची घेई
चित्त राही न, श्रीयावान
दु:ख सुटता सुटत, नाही
माय पावगे तू, लवकरी
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा लेकराची घेई
मायमाउली
चरणरज,
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
Saturday, September 24, 2011
कविता - वेळ.......त्याच्याविना,.......त्याच्यासवे
कुण्या एकीचा सखा-जोडीदार दूर गावी गेला, लवकर परत यायचा त्याने शब्द दिला होता, त्याला येणे न जमल्यामुळे, तिचा जो विरह झाला त्या दिवशीची सकाळ, संध्याकाळ आणि रात्र तिला फार वेगळी वाटली, पण दुसऱ्याच दिवशी तिचा आयुष्याचा जोडीदार परत आला असताना तिला तीच सकाळ, संध्याकाळ आणि रात्र कशी वाटली याचे हे वर्णन.
-----------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------
गेला तो दूरगावी, मी डोळे वाटेस लावूनी
शब्द येण्याचा होता ठरला, जो केवळ शब्दच राहिला
सांजसंध्या अंधारली, किडे पाखरे किरकीरली
संध्याही कोमेजून गेली, मी फक्त वाट पाहिली
रात्र घनघोर काळोखली , तिमिर भरून चितारली
आसवे दाटून आली, रात्रीतही मी फक्त वाट पाहिली
दिवस भकास उजाडला, कालचा विसर नाही पडला
करता काम जरी मी, वाटेकडे नजर लागली....... मी फक्त वाट पाहिली
पुढचा दिवस, पुन्हा संध्याकाळ आली, आणि गावावरून तो परतून आला,
मी डोळे वाटेस लावलेले, त्याचे पाऊल दूर पडलेले
संकेत मला समजलेले, मी धावत उंबऱ्यात होते
सांजसंध्या अवतरली, मनमोहक मोहरली
त्याच्यासावे कितीक प्रहर, मी सुखसागरात हरपली
रात्र सुंदर अंबरली , आज कसलीच उणीव न उरली
त्याच्या मिठीत अशी काही, माझी रात्र मंतरली
दिवस दिव्य उजाडला, तिमिर सारून प्रकाशला
मनी रात्रीचा आठव, माझी साथ सोबत त्याला
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
sachin.kulkarni78@gmail.com
Wednesday, September 21, 2011
कविता - दिवस.......पालटलेले
एका त्याची/तिची व्यथा, जी कधीच संपली नाही. वयाप्रमाणे आणि सावलीप्रमाणे देहाला कधीच सोडत नव्हती; अशी व्यथा. कुठलेंच काम त्यांचे होत नव्हते; जणू त्यांचे दु:ख काही संपतच नव्हते. सगळी आशाच सोडली होती; कारण आता कुठलेच काम न होण्याची सवयच लागली होती.
घेतला जन्म, अवतार कार्याला
घेतला जन्म, अवतार कार्याला
पण तो दिवस आला, त्याची/ तिची सगळी कामे अडचण न येता पार पडू लागली. हे कसे झाले यावर त्याचा / तिचा विश्वास बसे ना. तो अनुभव इथे शब्दात मांडायचा केलेला एक प्रयत्न.
-------------------------------------------------------------------------------------------------
भोग संगे, जडून देहाला
आयुष्य झडता, काळ सरायाला
एके दिनी परत, पुढच्या प्रवासाला
केले हात पुढे, जीवनास भेटण्यासी
वाटले धरेल, मजला असा उराशी
नियम जगण्याचे, उमगले विखारी
नित्य याचना करून, मी भिकारी
न रमलो; पचलो, दुनियेत या
अस्तित्व सांडोन, लागलो भटकाया
दाही दिशा हाच, राहिला मार्ग
मी एकटा, कसा ओळखू असली मार्ग
हेलावत शोधू लागलो, किनारा
ना कधी निवारा, फक्त डोक्यात वारा
पाण्यास शोधता, ते मृगजळ निघाले
मी सावलीस जाता, वृक्ष निष्पर्ण झाले
सरळ वाट धरिता, तरी पायी मोडे काटा
माझ्या हर एक निश्चयाला, मिळे नवा फाटा
वेळ बरी माझी, तरी काळ रुसलेला
या सगळ्या खटाटोपी, मी आयुष्य ओघळलेला
आज झाले अजब, धरती अंबरास मिळाली
मला वाटते माझी, सारी व्यथा होळीस मिळाली
आज मी पाणी शोधता, वरुनी मेघ बरसला
कुठे सावलीस पाहता, पुरा बगीचा मिळाला
जुनाच; रोजचाच त्रास, असा काही निवळला
भले पुरता बुजला वार, तरी घाव सोडून गेला
पालटले दिवस तरी, घाव उठावदार आहे
जुन्या दिवसांचा आठव ठेवून, पाय धरतीस आहे
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
Friday, September 9, 2011
कविता - पाऊस.......नवसंजीवन
तप्त निखारा जैसा, वैशाख हा पेटलेला
रापून अंग थकले, न उष्मा निवळलेला
वाट पाहतो जैसी, आतुरला चातक वेडा
बरसेल कधी घन, मिळेल उसासा थोडा
मेघही रुसला जैसी, सांगून सखी येईना
येरझार जीवाची, समजूत मनीची होईना
आला क्षण तो एके दिनी, दाटले मेघ श्यामल ऐसे
भेटता एकमेकास ते, गडगडाट हर्ष जैसा भासे
सुटला संयम; बरसले बेजोड, जुळविले नाते
अंबरातून धरतीस प्रेम; जीवन, पाण्यातून वाहते
आल्हाद घेई जागा, सारुनी दूर हा उष्मा
कण कण संजीवला, दूर पळविले ग्रीष्मा
धरती आकंठ प्याली, झेललेला थेंब अन् थेंब
जैसी गंगाच उगमली, देई प्रसाद तो भोळा सांब
होते पाणीच ते, दिसले गढूळ कईकांस
ते धरतीस ठावे, त्यास ती माने अमृतासम
काडीसम वाळले गवत, निष्पर्ण हर एक वृक्ष
हि वेळ दर वेळची, त्यास माहित होणार ते रुक्ष
होते तग धरुनी; त्यांचे वरती वाळके; हर एक अंग
परी धरतीत रोवले मूळ, पुनर्जीवनाचे ठाम मनी मर्म
परी जाईल समय; एके दिनी हाही, मिळेल नवजीवन
कदर ज्याची त्याला, हर एक थेंब करी नवनिर्माण
कैक म्हणती; हा किती बरसला, साचला; ना वाटही जाण्याला
त्या वृक्षास विचारा मोल; ज्याच्या फुलविले निष्पर्ण देहाला
Monday, August 29, 2011
भजन - जाणे सर्व गुरुनाथ
जाणे सर्व गुरुनाथ
देवरूप गुरुनाथ
संतरूप गुरुनाथ
योग्यमार्ग गुरुनाथ
योग्यवेळ गुरुनाथ
पापपुण्य गुरुनाथ
कर्मधर्म गुरुनाथ
प्रारब्धभोग गुरुनाथ
जाणे सर्व गुरुनाथ
मोक्ष मुक्ती गुरुनाथ
ज्ञानदाता गुरुनाथ
विवेकबुद्धी गुरुनाथ
चित्तशांती गुरुनाथ
संकटहरण गुरुनाथ
मार्गदर्शक गुरुनाथ
प्रमादक्षमा गुरुनाथ
योग्यतत्व गुरुनाथ
विदेही जाण गुरुनाथ
पुण्यराशी गुरुनाथ
ब्रह्मांडनायक गुरुनाथ
कृपासिंधू गुरुनाथ
तात जैसा गुरुनाथ
ममताही गुरुनाथ
पांथस्थ मित्र गुरुनाथ
प्रभूचरण गुरुनाथ
धाव पाव गुरुनाथ
वाट पाहे मी गुरुनाथ
आतुरला जीव गुरुनाथ
आळवितो गुरुनाथ
© सचिन पु. कुलकर्णी
Wednesday, August 24, 2011
गीत - कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
मराठी चित्रपट सृष्टीतला हुकुमी एक्का, मराठी चित्रपट सृष्टीची चाल मंदावली असताना मरगळ झटकून थेट अवकाशाला यशाची गवसणी घालणारा,
एकप्रकारे यशाची दादागिरीच करणाऱ्या शाहीर दादा कोंडके (कृष्णा) यांचा गोकुळाष्टमी तिथीदिवशी जन्म झाला होता. नुकत्याच झालेल्या गोकुळाष्टमिनिमित्त त्यांना माझ्याकडून हे गाणे एक विनम्र आदरांजली.
लहान तोंडी मोठा घास- दादांच्या शैलीत लिहायचा प्रयत्न केला आहे, गाणे बरे झाले तर दादांचा आशीर्वाद आणि सपशेल काही चुकले तर माझ्या तोकड्या बुद्धीप्रमाणे लिहिले असे समजून माफी असावी.
---------------------------------------------------------------
माझ्या मनात तू, चांदणं फुलवावं गं
तुझ्या हृदयात मी, जीवाला भुलवावं
कस्स अपुन, दोघांनी प्रेम फुलवावं
कुठ मिळतोय का, भेटायला थोडा वावं
कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
तुला पाहून, माझ्या काळजानं सोडलाय ठावं
अस्सा घातलायं, तुझ्या नजरेनं हृदयात घावं
तू लावशील का, तुझ्या नावापुढं माझ नावं
मग जमवुया, दोघ लग्नाचा झक्कास डावं
लगीन कराव्वं.......आहा.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
काय सुधरना, तुला कुठं कुठं फिरवावं
अस्स जोडीन, बाजाराला बी न्यावं
कस्स हृदयात, गोंदून तुला बसवावं
डोळं मीट्टून, सप्न तसच जपून ठीव्वावं
सप्न खुलवावं.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
तुल्ला हाताच्या, झोपाळ्यामधी झुलवावं
तुझ रूप तू, ऐन्यामधी गं खुलवावं
घालून हातात हात, बागेमंदी बसावं
तुझ्या वेणीत, गुलाब फुल माळावं
अस्सं फिर्रावं.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
सुख्खी संसारी या, गोडीन दोन घास खावं
एक तू; एक मी, मला तुला भरवावं
मन मिसळावं, जस्सं दुधात केशर पडावं
संभूपार्वती, रामशितावानी अपुन राहावं
अस्सं राहावं.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
© सचिन पु. कुलकर्णी
Friday, August 19, 2011
जागरण - जागा हो रे माणसा , तू जागा हो रे माणसा
जागा हो रे माणसा, तू जागा हो रे माणसा
कशापायी रडतो सदा, नशिबाला कोसतसा
कशापायी रडतो सदा, नशिबाला कोसतसा
ज्ञानदान बुद्धी न देता, प्राणी; पक्षी समाधानी
किरकोळ संकटाला माणूस, नशिबाला कारण मानी
किरकोळ संकटाला माणूस, नशिबाला कारण मानी
ईश्वराने केली सृष्टी, प्राणी पक्षी निर्मिले
काय सांग मेख असावी, माणसाला बी बनविले
काय सांग मेख असावी, माणसाला बी बनविले
कष्टी होता बिचारे प्राणी, ते फक्त ओरडू शकती
वाचा-मेंदू दिला जरी, माणूस विचार करी उरपाटी
वाचा-मेंदू दिला जरी, माणूस विचार करी उरपाटी
बिना हात पाय पक्षी, घरटे सुबक बांधती
हात; पाय असुनिया माणसे, संकटाला घाबरती
हात; पाय असुनिया माणसे, संकटाला घाबरती
पडो किती न थकता, मुंगी चढू पाहे भिंत
भविष्य कसे घडेल अपुले, माणसाच्या मनी खंत
भविष्य कसे घडेल अपुले, माणसाच्या मनी खंत
नजर करा कुत्र्यावारी, मुका परी लई ईमानी
बेईमानीच्या चढवी माणूस, रोज नव्या कमानी
बेईमानीच्या चढवी माणूस, रोज नव्या कमानी
निसर्ग नियम पाळती प्राणी, असती जरी बेजुबान
सारे नियम धाब्यावारती, माणसाची जात बदनाम
सारे नियम धाब्यावारती, माणसाची जात बदनाम
वरुनी पाहता धरतीस, देवही झाला असेल मूक
कशी अशी बुद्धी झाली, माणूस बनविला हीच चूक
कशी अशी बुद्धी झाली, माणूस बनविला हीच चूक
sachin.kulkarni78@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)