आवाहन - माळीण दुर्घटना

"वनवासी कल्याण आश्रम" या संस्थेतर्फे आम्ही कपडे, स्वयंपाकाची भांडी, औषधे, तंबू, तयार-टिकाऊ खायचे पदार्थ अशा वस्तू लोकांकडून गोळा करून दुर्घटनास्थळी पोचत्या केल्या. वैद्य आणि औषधे घेऊन एक रुग्णवाहिका रोज पाठवण्यात येत होती. आश्रमाच्या स्वयंसेवकांनी मृत देहांचे अंत्यसंस्कार केले. निधी संकलन करायचे काम अजूनही चालू आहे, आणि त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ईश्वर मृतात्म्यांना सद्गती देवो ! 

Comments

Post a Comment